ग्रामीण सहजीवन निबंध मराठी | GRAMIN SAHJIVAN IN MARATHI

ग्रामीण सहजीवन निबंध मराठी | GRAMIN SAHJIVAN IN MARATHI | GRAMIN SAHJIVAN MARATHI NIBANDH – नमस्कार मित्रांनो, ह्या पोस्टमध्ये तुम्हाला मराठीमध्ये “ग्रामीण सहजीवन निबंध मराठी” या विषयावर सविस्तर निबंध मिळेल.

हा निबंध तुम्ही तुमच्या सरावासाठी नक्कीच वापरु शकता तसेच, सराव करुन हा चांगले निबंध कसे लिहायचे यासाठीही आम्ही सर्व विद्यार्थ्यांना मदत करतो.

लक्षात ठेवा मित्रांनो जो शिकून पुढे जातो तोच यशस्वी होतो, आम्ही आशा करतो की या निबंधामुळे तुम्हाला चांगले निबंध लिहीण्यास प्रोत्साहन मिळेल. 

आम्ही परिक्षेत विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे परिक्षेत फसवणूक / चिटींग करण्यास प्रोत्साहन देत नाही. आम्ही हे निबंध फक्त विद्यार्थ्यांच्या सरावासाठी व मार्गदर्शनासाठी लिहीत आहोत. 

या निबंधामध्ये GRAMIN SAHJIVAN MARATHI NIBANDH यावर सविस्तर निबंध मिळेल.

निबंध‍ात सामाविष्ठ केलेले मुद्दे

  • ग्रामीण जीवनातील स्नेहभाव
  • अडीअडचणीत मदत करणे
  • मुलांपासून थोरांपर्यंत एकोपा
  • ग्रामीण भागातील परस्परसंबंधांचे स्वरूप
  • ग्रामीण भागातील उणिवा
  • एकोप्याचा आधार

ग्रामीण सहजीवन निबंध मराठी | GRAMIN SAHJIVAN IN MARATHI | GRAMIN SAHJIVAN MARATHI NIBANDH

आमच्या गावी आमचे घर आहे. शेती आहे. तेथे आमचे काका राहतात. आम्ही शहरात राहतो. एकदा काका आमच्याकडे चार दिवसांसाठी आले होते. रात्री आम्ही जेवायला बसलो होतो. गप्पाटप्पा जोरात चालू होत्या. काका गावच्या गमतीजमती सांगत होते. हास्यविनोद चालू होते. तेवढ्यात अचानक गावाहून फोन आला.

काकांच्या घरात घरफोडी झाली होती. तोडफोडीचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी घाव घेतली. गावी घरे दूर दूर असतात. त्याचा चोरट्यांनी फायदा घेतला होता. परंतु आरडाओरड करून लोकांनी सर्वांना गोळा केले. चोरांशी झटापट केली. त्यांना चोप दिला आणि पोलिसांकडे सुपूर्द केले. काका घावतपळत गावी गेले.

स्वतःच्या जिवाची पर्वा न करता गावकरी चोरांना भिडले होते. शेजाऱ्यांमुळे खूप मोठी हानी टळली होती. काकांचा ऊर भरून आला. त्यांनी हात जोडून सर्वांचे आभार मानले. ‘”अहो, आभार कसले मानता? आज तुमच्यावर पाळी आली. उदया आमच्यावरही येऊ शकते. सर्वांनी एकमेकांना मदत केली, तर आपले सगळ्यांचेच मले होईल, ” लोकांनी काकांना समजावले.

लोकांचे हे म्हणणे खरेच होते. ग्रामीण भागात लोकच लोकांचे रक्षण करतात. आमच्या गावी तर दिवसा दार लावतच नाहीत, तरी कोणाच्याही घरी चोरी होत नाही. मुले तर या घरातून त्या घरात थावतपळत पकडापकडीचा खेळ खेळत असतात. एखादा पदार्थ वा वस्तू अचानक अवेळी हवी झाली, तर लोक शेजाऱ्यांकडे हक्काने जातात. घर परतण्यासारखी कामे तर सहकार्यानेच होतात.

सर्वजण एकत्रितपणे एकेकाचे घर परतत जातात. त्यामुळे एका दिवसात एकेका घराची कौले काढून पुन्हा लावली जातात. कोणाच्याही घरातील धार्मिक कार्याला आवश्यकतेप्रमाणे सर्वजण सहकार्य करतात. आजारपणात हमखास मदत केली जाते. पहिला पाऊस पडतो, त्या वेळी एखादया घरातील कर्ता माणूस आजारी पडला तर बाकी चे सर्वजण विचारविनिमय करून त्या माणसाचे शेत नांगरून देतात. अशा वेळी कोणीही कुरकुर करीत नाही. कारण अशी वेळ कोणावरही येऊ शकते, याची जाणीव सर्वांना असते.

मला नेहमी याचेच कुतूहल वाटत राहते की, ग्रामीण भागात हे कसे काय घडते ? मी पाहतो की, तेथे गावातील सर्व माणसे एकमेकांना पूर्णपणे ओळखतात. सर्वांच्या नातेवाइकांसकट सर्व माहिती सगळ्यांना असते. सर्वांना एकमेकांबद्दल जिव्हाळा असतो. एखादयाने काही खास कर्तबगारी दाखवली, तर गावातल्या सगळ्यांना ती स्वतःची कर्तवगारी वाटते आणि त्यांची छाती अभिमानाने फुगून जाते.

वास्तविक पाहता गावात अनेक बाबींची कमतरता असते. वाहतूक सेवा, आरोग्य सेवा; पाणी, वीज, जीवनोपयोगी वस्तू यांचा पुरवठा शिक्षणाच्या व रोजगाराच्या संधी इत्यादी सर्व बाबतींत उणिवा असतात. त्यामुळे लोक हतबल, काही प्रमाणात निराश झालेले असतात. त्यामुळेच बहुतेक त्यांना एकमेकांच्या सहकार्याची गरज भासते.

अडचणीच्या वेळी एकमेकांच्या मदतीला धावून गेले पाहिजे, हे त्यांना मनोमन जाणवलेले आहे. या कारणांनी सगळेजण स्वतःचे जीवन इतरांच्या जीवनाशी जुळवून घेतात. आपले विचार, कल्पना, स्वप्ने, सुखदुःखे, अडीअडचणी इत्यादींशी संपूर्ण ग्रामीणजोवन जोडून घेतात. किंबहुना तशी जगण्याची रीतच निर्माण करतात. ग्रामीण सहजीवनाचा हाच मुख्य आधार आहे.

हे निबंध सुद्धा वाचा –