मी सैनिक बोलतोय मराठी निबंध | ME SAINIK BOLTOY ESSAY IN MARATHI

मी सैनिक बोलतोय मराठी निबंध | ME SAINIK BOLTOY ESSAY IN MARATHI – नमस्कार मित्रांनो, ह्या पोस्टमध्ये तुम्हाला मराठीमध्ये “ME SAINIK BOLTOY ESSAY IN MARATHI” या विषयावर सविस्तर निबंध मिळेल.

हा निबंध तुम्ही तुमच्या सरावासाठी नक्कीच वापरु शकता तसेच, सराव करुन हा चांगले निबंध कसे लिहायचे यासाठीही आम्ही सर्व विद्यार्थ्यांना मदत करतो.

लक्षात ठेवा मित्रांनो जो शिकून पुढे जातो तोच यशस्वी होतो, आम्ही आशा करतो की या निबंधामुळे तुम्हाला चांगले निबंध लिहीण्यास प्रोत्साहन मिळेल. 

आम्ही परिक्षेत विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे परिक्षेत फसवणूक / चिटींग करण्यास प्रोत्साहन देत नाही. आम्ही हे निबंध फक्त विद्यार्थ्यांच्या सरावासाठी व मार्गदर्शनासाठी लिहीत आहोत. 

या निबंधामध्ये मी सैनिक बोलतोय यावर सविस्तर निबंध मिळेल, या निबंधामध्ये ,सीमेवरील जवानाचे मनोगत, या मुद्द्यावर विसतृत चर्चा केलेली आहे.

निबंध‍ात सामाविष्ठ केलेले मुद्दे

  • घरापासून दूर
  • दहशतवादी हल्ले
  • लक्षपूर्वक स्वदेश रक्षण
  • प्रतिकूल हवामान
  • देशवासीयांचे प्रेम
  • कामाची कृतार्थता
  • काम करण्यास स्फुरण
  • देशाच्या सीमेचे रक्षण
  • जय जवान

मी सैनिक बोलतोय मराठी निबंध | ME SAINIK BOLTOY ESSAY IN MARATHI

मी सैनिक बोलतोय मराठी निबंध

दहा महिने झाले, घर सोडल्याला. तेव्हासुद्धा घरी फक्त दोन दिवस होतो. पण इकडे सीमेवर अकस्मात गडबड झाली. दहशतवादी हल्ले सुरू झाले आणि मंजूर रजा रद्द झाली. तातडीचा हुकूम निघाला होता.

डोळे पुसतच घरच्यांचा निरोप घेऊन मी घर सोडले आणि दोन दिवसांचा खडतर प्रवास करीत, या सीमेवरील छावणीत येऊन दाखल झालो. वाटेत जनतेने अत्यंत आपुलकीने वागवले. तेव्हा मनाला खूप दिलासा मिळाला.

तेव्हापासून आजपर्यंत मी या मोक्याच्या ठिकाणी पहारा देत उभा आहे. हे नाके भारताच्या उत्तर सीमेवर आहे. येथून दूरवर शत्रूची चौकी दिसते. तेथेही माझ्यासारखाच त्यांचा एक जवान तासन्तास खडा पहारा देत उभा आहे.

डोळ्याला दुर्बीण लावून आम्हांला सतत जागरूकपणे पहारा करावा लागतो. शत्रूच्या गोटात थोडीशी हालचाल दिसली, तरीही आम्हांला त्याची नोंद घ्यावी लागते. डोळ्यात तेल घालून आपल्या भूप्रदेशाचे रक्षण करावे लागते. अशा वेळी मनात येते की का आलो मी या सीमेवर? माझ्या गावात मी सुखी नव्हतो का?

आजही मला गावातले ते दिवस आठवतात. खाऊनपिऊन सुखी होतो आम्ही. पण कुटुंब वाढले नि केवळ शेतीवर गुजराण होईना! घराबाहेर पडणे आवश्यक झाले. लहानपणापासून सैनिक होण्याचे स्वप्न मनात घोळत होते.

गावातील बऱ्याच जणांनी सैनिक होऊन मोठी कामगिरी गाजवली होती. आपणही आपल्या देशासाठी असाच पराक्रम करावा या हेतूने उत्साहाने सैन्यात भरती झालो. वर्ष-दीड वर्ष खूप खडतर शिक्षण घेऊन येथील कामगिरीवर रुजू झालो.

येथे सीमेवर प्रचंड थंडी असते. अशा वेळी काही क्षण कामाचा कंटाळा येतो. पण लगेच कर्तव्याची आठवण येऊन पुन्हा कामाला लागतो. महिन्यातून एखाददुसरे घरचे पत्र येते व घरची खुशाली कळते. तसा हल्ली मोबाइल संपर्कही असतोच, पण प्रथम सेवा आणि नंतर घर.

परवा मकरसंक्रांतीला अनेकांनी तिळगूळ पाठवला. राखीपौर्णिमेला काही भगिनींनी राख्या पाठवल्या. दिवाळीचा फराळही आला. थंडी सुरू झाली तेव्हा अनेक माता, भगिनींनी स्वेटर-मफलर विणून पाठवले.

तेव्हाच समाधान वाटले की, आपण एकटे नाही. आपल्यामागे आपला देश आहे. आता आम्ही आमच्या घरापासून दूर आहोत; पण त्याची चिंता वाटत नाही. माझा देश माझ्या घरादाराची, माझ्या मुलामाणसांची काळजी घेईनच! आणि मी माझी माझ्या देशाच्या सीमेची काळजी घेईनच!

यूट्यूब व्हिडिओ –

हे निबंध सुद्धा वाचा-